चक्रधर मेश्राम ब्रम्हपुरी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात
जनतेचा कौल नवीन चेहऱ्याकडे
चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि.१२/१०/२०२४:- आगामी विधानसभा निवडणुकीत धोकेबाजांपासुन सावध व्हा. भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या, वंशवादी प्रवृत्तीच्या, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी काळ्या पैशाचा, बेहिशेबी मालमत्तेचा गैरवापर करून, अनेक शहरा.. शहरात बॅनर बाजी करून विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे . महाराष्ट्रातील जनतेला चाललेला झंझावात लक्षात येऊ लागला आहे. आम समाजातील नागरीकांच्या नव्हे , पण गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वाटत असेल की, नवीन उमेदवार अल्पखर्चात कसे काय निवडून येऊ शकतात? परंतु आता निवडणुकीत करोडो रुपये खर्च करूनही निवडुन येण्याची शक्यता धुसर दिसत आहे. हे जनतेने ठरविले आहे.अशा गुंड प्रवृत्तीच्या, लोकांना सैनिक समाज पार्टीच्या व्यासपिठावरुन खुले आव्हान करण्यात येते की, पैसे असतील पण बुध्दी नाही,याची आठवण असावी असे मत प्रदेशाध्यक्ष ॲड शिवाजी डमाळे यांनी नुकत्याच पुणे येथील जाहीर सभेत सांगितले.
जनतेचा कौल लक्षात घेता महाराष्ट्रातील राजकारणात अल्पखर्चात निवडुण देण्यासाठी जनता सज्ज झाली आहे. महाराष्टात सैनिक समाज पार्टीच्या सिटीझन सोल्जरांकडे बुध्दीचा भरमसाठ साठा आहे. अल्पखर्चात पक्ष चालविला जात आहे. अल्पखर्चात दोनशेहून अधिक आमदारांना महाराष्ट्रातील जनताच निवडून देणार आहेत. ब्रम्हपुरी विधानसभा मतदार संघातून चक्रधर मेश्राम यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असुन या क्षेत्रातील वरिष्ठ , जेष्ठ मान्यवर मंडळींनी आपला पाठिंबा असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या क्षेत्रात आगामी निवडणुकीत नवीन चेहऱ्याकडे जनतेचा कौल वाढत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. ब्रम्हपुरी विधानसभा मतदार संघातील बहुचर्चित संभाव्य उमेदवार चक्रधर मेश्राम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत सांगितले की ” माझ्याशी तिन .. चार राजकिय पक्षाच्या राष्ट्रीय आणि प्रदेशाध्यक्षांनी तिकिट ,एबी फार्म देण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु वस्तुस्थिती आणि जनतेच्या मनातील भावनांची कदर करुनच कोणत्या पक्षाचे तिकीट घेणे योग्य ठरेल. ते मी ठरविणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत बहुमतांनी निवडुन येण्यासाठी आपणाला जनताच सहकार्य करेल आणि आशिर्वाद देऊन विजयी करेल असा आशावाद व्यक्त केला. महाराष्ट्रातील बंधु..भगीनींच्या , वडिलधाऱ्या व्यक्तींच्या आशिर्वादाने भ्रष्टाचारी , घराणेशाही , चालवु इच्छिणाऱ्या आमदार खासदारांचे पेंशन योजना बंद करून घेण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करुन समस्त युवा पिढीला रोजगार, नोकरी, मिळवून देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जातील. भारतीय सैनिक आणि आणि शेतकरी, महिला यांच्या हक्काचे स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करण्यात येणार. महाराष्ट्रातील जनता सक्षम करण्यासाठी आणि जनतेच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना सुरू करण्यासाठी , महिलांवरील अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी कठोर कायदे करण्यासाठी आणि त्याची योग्य मार्गाने अंमलबजावणी करण्यासाठी सदैव तत्पर राहाणार असल्याचे मतही नवनिर्वाचित उमेदवार चक्रधर मेश्राम यांनी आमच्या प्रतीनिधींशी बोलतांना व्यक्त केले.

