रत्नापूर येथे आदिवासी माना जमातीच्या वतीने नागदिवाळी वार्षिकोत्सव साजरा

0
93

मठपुजा तथा खनपूजा व मॉ. मानिकादेवी मुर्तीची स्थापना

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर

सिदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे मॉ. मानिकादेवी पेनठाना माणिकगड रत्नापुर येथे प्रेक्षणीय स्थळ आहे. दरवर्षीला या ठीकानी नागदिवाळी वार्षिकोत्सव कार्यक्रम साजरा केला जातो .या वर्षाला सुद्धा मॉ. मानीकादेवी आदिवासी चैरिटेबल ट्रस्ट व आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना यांच्या सयुक्त विद्यमाने नागदीवाळी वार्षीकोत्सव कार्यक्रम दि २० डिसेबर ते २२ डिसेंबर या तीन दिवसीय कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.
दि. २० डिसेंबरला मुला मुलींचे मैदानी खेळ घेण्यात आले ,दि २१ डीसें ला सकाळी उद्घाटन करुण परिसरात वृक्षारोपन करण्यात आले . मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला वक्तृत्व स्पर्धा गित गायन स्पर्धा घेण्यात आली पारंपारीक आदिवासी नृत्ये व वेषभुषा सादर करण्यात आली. सायंकाळी सांजवात दिपपुजन करुण गावातील मुख्य मार्गाने मिरवणुक काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनी समाजबांधवा सोबत गावकरी महिला पुरुष उपस्थीत होते दि. २२ डिसें ला समाज प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजीक कार्यकर्ते संबा चौके हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजभे, मुलनिवासी आदिवासी महासभा कार्यकर्ता गणेश हनवते , अशोक कुळमेथे, शामराव नन्नावरे ,श्रावण सावसाकडे, राजीराम दडमल, श्रीधर भरडे, प्रभु ढोक ,बाबुराव वाकडे ,ग्राम पंचायत सदस्य वासुदेव दडमल, विश्वनाथ सावसाकडे ,विनायक गायकवाड, रागीना ढोक, कृपाली दडमल ,सुनिल ढोणे आदी मान्यवर मंचावर उपस्थीत होते. यावेळी उपस्थीत पाहुण्यानी नागदिवाळी कार्यक्रमा निमित्याने आपल्या आदिवासी माना जमाती रीतीरीवाज, आपली संस्कृती, परंपरा आपल्या पूर्वजांचा इतिहास या संबंधीची माहिती विस्तृत आणि सविस्तर सांगितली.नागदिवाळी प्रमुख सण असल्याचेही नमुद करुण सर्व कुटुबांचा आपआपसात परीचय व्हावा व समाज एकसंघ बनुन संघटन व्हावे हा महत्वाचा उद्देश असल्याचेही माहिती दिली. रत्नापूरात चाललेल्या या तीन दिवसीय कार्यक्रमात स्वच्छता मोहीम ,वृक्षारोपन, तोरण ,पताका, रांगोळी काढुन परीसर सजावट असे नानाविध उपक्रम सुद्धा राबवण्यात आले.
वरील नागदिवाळी वार्षीकोत्सव कार्यक्रमाचा हा 8 वर्ष असून मोठ्या उत्साहात व थाटात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. वरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक समतादूत कृपाली दडमल यांनी केले. तर संचालन अतुल बारेकर यांनी केले व आभार वासुदेव दडमल यांनी मानलेत.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मॉ. माणिकादेवी आदिवासी चौरीटेबल ट्रस्ट व आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना येथील सर्व पदाधीकारी व सदस्य व संपूर्ण आदिवासी माना जमात समाज बांधव ,भगीनी यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here