प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – मानवजातीचे उद्धार करते स्वामी विवेकानंद

0
49

स्वामी विवेकानंद हे महापुरुष होते,ऋषी होते ,की साक्षात भगवान शंकर होते, हे सांगणे जरी कठीण असले तरी ते असंख्य मानव जातीचे खरे मित्र होते.भारतमाताचे सच्चे सुपुत्र होते.हे मात्र निर्विवादपणे सांगता येईल.भारतावर हृदयापासून प्रेम करणारे, मानवाचे दुःख बघून व्यथित होणारे, मानव जातीच्या उद्धारासाठी प्राणार्पण करणार आणि भारताच्या अध्यात्मिक संपदेतला जगाला परिचय करून देणारे महान योद्धा भारत मातेचा गौरव वाढवणारा एक मात्र वीर पुत्र म्हणजे स्वामी विवेकानंद होय.1000 वर्षाच्या परकीय राजवटीमध्ये भारत आणि भारतीय संस्कृती हे मृत पाय झालेली होती.तेव्हाच्या आणीबाणीच्या प्रसंगी स्वामी विवेकानंद या अवनीतलावर अवतीर्ण झाले व त्यांनी निद्रित भारताला जागृत केले.150 वर्षांपूर्वी त्यांचा अमूल्य विचाराची जेवढी गरज होती त्याहीपेक्षा अनंतपटीने आज समाजाला त्यांच्या विचाराची खरी गरज आहे . स्वामी विवेकानंदांनी आदर्श शिक्षण विषयक बोलताना ते म्हणाले होते की एखाद्या रोपट्याला तुम्ही जसे वाढ म्हणू शकत नाही तसेच कुणाही मुलाला तुम्ही शिकू शकत नाही .ते रोपटे आपल्या स्वाभाविक वाढीने वाढते .मुलं देखील स्वतः शिकत असते .आपण त्यांच्या वाढीस मदत करू शकतो .आपले सारेच करणे सकारात्मक नसून नकारात्मक सुद्धाही असते .मार्गातील अडथळे फक्त तुम्ही दूर करू शकता.आणि मग आपल्या स्वधर्मानुसार त्यांना ज्ञान होईल .जमिन किंचित भुसभुशीत करा म्हणजे रोप बाहेर येणे सोपे जाईल.कुंपण वगैरे घालून ते कशानेही मरणार नाही याची काळजी घ्या.त्या वाढणाऱ्या बिचाला पाणी माती हवा इत्यादी आवश्यक गोष्टी देऊ शकता आणि येथेच तुमचे काम संपते. पुढे त्याला लागणाऱ्या साऱ्या गोष्टी ते आपोआप घेईल. या साऱ्या गोष्टी आत्मसात करून घेऊन ते आपल्या प्रत्येकानुसार वाढेल .हीच गोष्ट मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा लागू होते . मुलं स्वतः च शिकते. सारे ज्ञान आताच वसत असते .त्याला जागी करण्याचच काय ती आवश्यकता आपली आणि शिक्षकांचे काम तेवढेच असते.
आपल्याला कशा शिक्षणाची गरज आहे हे सांगताना स्वामी विवेकानंदांनी सांगितले आहे की परक्या भाषेत दुसऱ्यांचे विचार घोकुन ते डोक्यात कसेतरी कोंबून आणि त्यांच्या बळावर विद्यापीठाच्या चार दोन पदव्या मिळून तुम्ही स्वतःला सुशिक्षित समजत असतात हे काय शिक्षण झाले? असे ठाम मत विवेकानंदांचे होते.त्यांच्या म्हणण्यानुसार साऱ्या शिक्षणाचे ध्येय तुमच्या देशाला लाभ होणारे असावे .डोळे उघडून पहा जरा आपल्या या धनधान्य समृद्धीसाठी विख्यात असणाऱ्या सुवर्णभूमीत दोन घास अन्नासाठीच कितीतरी करुणाआर्त किंकाळ्या उठताना तुम्हाला ऐकू येतील म्हणून तुमचे शिक्षण हे दैन्य निवारण करणारे असावे .जे शिक्षण सामान्य समाजाला जीवनात संग्रामासाठी बद्धपरिकार करणारे, उत्तम चरित्र निर्माण करणारे, दयाभाव दाखवणारे ,सिंह पराक्रम करणारे असल्यास ते शिक्षण या
सज्ञेला पात्र होईल . हे अगदीच खरे आहे आज आपल्याला अशा शिक्षणाची गरज तर आहेच.त्याचप्रमाणे ज्या शिक्षणाने शील बनते.मानसिक शक्ती वाढतात.बुद्धी चौफेर विशाल होते.आणि ज्यायोगे मनुष्य आपल्या पायावर उभा राहू शकतो. तसेच साऱ्या शिक्षणाचे ध्येय माणूस निर्माण करणे हे असले पाहिजे.शिक्षणाचा उद्देश आहे माणसाला विकसित होण्याला सहाय करणे.आणि म्हणूनच माणूस निर्माण करणारे सिद्धांत आपल्याला हवीत. एकंदरीतच सर्व तऱ्हेने माणूस निर्माण करणारे शिक्षण आपल्याला हवे आहे.परकीय नियंत्रण नसलेल्या पद्धतीने आपल्याच ज्ञानाचा विभिन्न शाखांच्या अध्ययनाची आज आपल्याला जरुरी आहे आणि त्याचबरोबर आवश्यकता आहे इंग्रजी भाषेची व पश्चिमात्य विज्ञानाची . आपल्याला अशा यांत्रिक विद्येची आणि इतर तस्सदृश्य अशा सर्व गोष्टीची गरज आहे की ज्यायोगे उद्योगधंद्याची वाढ होईल व माणूस नोकरीच्या मागे न लागता आपली उपजीविका करू शकेल.आणि आल्या आपत्तींना तोंड देण्यास समर्थ होईल.अशा प्रकारचे अमूल्य विचार युवकांना स्वामी विवेकानंदांनी सांगितले होते.आणि म्हणूनच आजचा विचार करता या विचाराची नितांत गरज आहे.प्रत्येक तरुणाने स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करून त्यानुसार शिक्षण घ्यायला हवे.

लेखिका संगीता नागदिवे..
यवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here