मृतक विद्यार्थ्याच्या विरहात निराश उपोषण कर्त्या बापाने दर्शविली आत्महत्येची इच्छा…!

0
207

जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674

भंडारा – जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात एका आदिवासीं 11 वर्षीय धीरज सीताराम फरदे या विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यूचे गुढ कायम असुन विना चौकशीने एकाही आरोपीवर कोणताही गुणा नोंदवून शिक्षा झाली नसल्याने न्यायाची गुहार लावत दोनदा आमरण उपोषणाला बसल्यावर शासन व प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली जात नसल्याने एकुलत्या एक मुलाच्या विरहात निराश पित्याने शासन व प्रशासनाला आत्महत्येचा विचार करुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्या करण्याची परवानगी मागितली असल्याने उपोषण कर्त्यांच्या संतापाने वेगळी वळण मिळाली आहे.

आठ महिन्याचा कालावधी लोटूनही न्यायीक मार्गाने लढा कायम

लक्ष्मी शिक्षण संस्था द्वारा संचालित स्व. निर्धनराव वाघाये पाटील सैनिकी विद्यालय केसलवाडा (वाघ) येथे 11 वर्षीय शालेय विद्यार्थी धीरज सिताराम फरदे याचा संशयास्पद घातपाताने शालेय परिसरात मृत देह आढळला पण त्याच्या मृत्यु की हत्या या प्रकरणाला अद्यापही छळा लागला नसल्याने आठ महिन्याच्या कालावधी लोटूनही अजुनपर्यंत घटनेची उच्चस्तरीय चौकशी व कार्यवाई झाली नसल्यामुळे सी. बी .आय. चौकशी करून गुन्हेगारावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याबाबद वेळोवेळी निवेदन देण्यात आले.या न्यायिक मागणी करिता दुसऱ्यांदा आमरण उपोषण करुणही प्रशासनाला जाग येत नाही त्यामुळे शासन व प्रशासनाकडून गरीब विद्यार्थ्याच्या मृत्यु ला न्याय मिळत नसल्याने कंटाळून, मृतकाच्या बापाला न्याय मिळत नसल्याने हताश झालेल्या बापाने येत्या दोन दिवसात मृतकाच्या बापाला न्याय न मिळाल्यास ते स्वतःचे आत्मदहन करून आत्महत्या करण्याची परवानगी जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधिक्षक कार्यालयाला सादर निवेदनात म्हटले आहे.

मृतक धीरज च्या मृत्युचे आरोपी ला अटक व्हावी आणि मृतकाच्य आत्म्याला न्याय मिळावा म्हणून वडील सिताराम फरदे आणि न्याय हक्कासाठी लढणारे केंद्रिय मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते महेन्द्र तिरपुडे यांनी दि.14 जानेवारी 2025 ला उपोषण केले असता 16 जानेवारी 2025 रोजी पोलीस अधिक्षकांनी उच्च स्तरीय चौकशी करून गुन्हेगारांना अटक करण्याचे आश्वासन देऊनही आठ महिन्याचा कालावधी लोटूनही कोणत्याच प्रकारची चौकशी आणि कारवाई झालेली नाही.

पोलिस अधिक्षकानी लिखीत आश्वासन देऊनही कार्यवाही नाही

मुलगा गरीब आदिवासीं असल्यामुळे अन्याय होत असून शाळा एका श्रीमंत राजकीय नेत्याची असल्यामुळे शासन व प्रशासण विद्यार्थ्याच्या मृत्यूला दुर्लक्ष करत आहे.विद्यार्थ्याच्या मृत्यु ला वाचा फुटत नाही कोणत्याही कार्यवाही विना प्रकरण दाबल्या जात असल्याचे दिसुन येते.

आमरण उपोषणाचा आजचा आठवा दिवस

मृतक धीरज चे वडील सिताराम फरदे व केंद्रिय मानवाधिकार संघटनचे पदाधिकारी तथा सामाजीक कार्यकर्ते महेंद्र तिरपुडे यांनी पुन्हा दुसऱ्यांदा 02एप्रिल 2025 पासून दुसऱ्यांदा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा आठवा दिवस असुनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे भविष्याचा आधार एकुलता एक मुलगा गमावल्याने संयमाचा बांध सुटला असुन दोन दिवसात न्याय न मिळाल्यास मृत्यु ची ईच्छा दर्शवत मृतक धिरज या विद्यार्थ्याच्या बापाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याची ईच्छा व्यक्त करत निवेदनाद्वारे
आत्मदहन करण्याची परवानगी मागितली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाला निवेदन सादर करुन आत्महत्या करण्यासाठी परवानगी मागितली आहे. त्यामुळे या उपोषण कर्त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here