आगामी निवडणूक जि. प. व पंचायत समिती आढावा बैठक.
त्रिकांत डांगरे आलापल्ली शहर प्रतिनिधी 8669198535 – आल्लापली- आगामी स्थानिक स्वराज्य समितीच्या सार्वत्रिक निवडणुका 2025 जिल्हा परिषद व पंचायत समिती चे निवडणूक चे भीगूल वाजले असून सर्व पक्ष आपल्या परी आढावा बैठक सभा व लोकांशी संपर्क वाढविण्याचे कार्य सूरू झाले असून राष्ट्रीय काँग्रेस पार्टी तर्फे नूकतेच दि. 19 जून 2025 वी ला आल्लापली येथील कन्यका मंदिर येथे हजारो कार्यकर्ता व पदाधिकारी यांच्या उपस्थित आढावा सभेचे आयोजन करण्यात आले या आढावा सभेला चिमूर/ गड.लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉक्टर नामदेव किरसान राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे गडचिरोली जिल्ह्याचे निरीक्षक माननीय सचिन नाईक व जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ ब्राह्मणवाडे व माजी आमदार तलांडे पेंटा रामा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार माननीय हनुमंत मडावी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले याप्रसंगी जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित जन समूदायला अहेरी विधानसभा तील जास्तीतजास्त जि. प. व पंचायत समिती चे उमेदवार विजयी करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावे या करीता सर्व कार्यकर्ता नी जोमाने काम करण्याचे गरज आहे. डॉक्टर नामदेव किरसान खासदार यांनी सर्व कार्यकर्तानी गावा गावात जावून लोकांशी सामान्य नागरिक यांचे भेटी घाटी घेवून जनसंपर्क वाढविण्याचे कार्य पदाधिकारी यांनी करावी. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ता जास्तीत वाढविण्याचे प्रयत्न करावे. मा. एडवोकेट सचिन नाईक निरीक्षक गडचिरोली यांनी प्रथमच भेटीत इकडील परस्थिती पाहून शोकांतिका व्यक्त केले राज्याचे मुख्यमंत्री हे गडचिरोली जिल्हा हे आदिवासी बहूल जिल्हा असल्यामूळे मागसलेले जमात या ठिकाणी राहत असल्यामूळे यांचा विकास करण्याकरीता जिल्हाचे पालकत्व स्विकारले असे वाटले होते. परंतु प्रत्यक्षात पाहिलं तर वेगळेच कारण समोर आले. अजून ही येथील समाज बांधव विकासापासून फार दूर आहेत अशा पक्षाला आपण धडा शिकवयाला पाहीजे असे म्हटले व भोगस मतदान वाढण्याची संभावना जास्त असल्यामूळे मतदान यादी पूर्णरचने कडे लक्ष्य द्यावी. मा. अजयभाऊ कंकडालवार यांनी पक्षाला वाढविण्याचे काम आम्ही प्रामाणिक पणे करीत आहोत. वरचे वरीष्ठानी सूद्धा आम्हाच्या सामान्य कार्यकर्त्यांना प्रोत्साहन करण्याकरीता वारंवार बैठाका घेवून येणाऱ्या निवडणूकीत जे निवडूण येथील असे नविन उमेदवारांना जे ग्राउंड लेवल वर जावून काम करीत आहेत अश्या उमेदवारांना स्थान देण्यात यावी. जेणे करून जास्तीत जास्त जागा वर विजयी मिळविता येईल. या वेळी पाच ही तालूक्याचे ता. अध्यक्ष उपस्थीत होते.

