
भारताचे संविधान हे एक सुख, शांती, समानता, बंधुता याचे एक प्रति रूप आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी दिलेला एक जगण्याचा महाग्रंथ म्हणजेच भारताचे संविधान आहे. यातील कलमा तरतुदी अनुसार भारत देशातील प्रत्येक नागरिकांवर याचा प्रभाव असतो. विश्वरत्न, ज्ञान सूर्य ,ज्ञानाच्या अथांग सागरास नमन ज्यांनी आपल्याला भारतीय संविधान दिले .आम्ही सदाकाळ त्यांचे ऋणीच आहोत. 299 सदस्यांची यात समाविष्टता होती ही दोन वर्ष 11 महिने 18 दिवसात जवळपास 12000 पानांचा संविधान बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या रात्रंदिवसाच्या मेहनतीने आपल्याला भारताचा संविधान सुपूर्द केला. भारत देश हा बहुप्रांतीय, बहुभाषीय व विविध प्रकारच्या वेशभूषेने नटलेला देश तरी असला तरी संविधानात अधोरेखित मुद्द्यानेच येथील कार्य व्यवस्था चालत असते.
भारतीय संविधान आहे
जगण्याचा आधार शिल्प
या व्यतिरिक्त नाही चालणार
कोणताही मोठा प्रकल्प.
रंजना भैसारे, नागपूर















