
संविधान तयार करण्या ,
दोन वर्ष, महिने अकरा ,
आणिकही दिवस अठरा,
होते लागले , त्या घटनेला.
एकोणीसशे पन्नास साली ,
राज्यघटना लागूस झाली.
त्यापूर्वी सव्वीस नोव्हेंबरी,
ती स्वीकारण्यात आली होती.
संविधान दिन म्हणून तो ,
दोन हजार पंधरा साली ,
सव्वीस नोव्हेंबर दिनासी,
प्रथम साजरा झाला देशी.
डाॅ. आंबेडकर हे अध्यक्ष ,
संविधान लागू करण्यास .
प्रेम बिहारी यांचे लिखित ,
लागू सव्वीस जानेवारीस.
एकोणीसशे पन्नास तेव्हा,
भारताचा सर्वोच्च कायदा ,
राजकीय संहिता मान्यता ,
मूलभूत अधिकार सर्वां .
लोकांनी लोकांसाठी असावे,
समभाव , बंधुता नांदावे .
अस्पृश्यतेस दूर सारावे,
संविधान ‘ एकता ‘ सांगते.
डाॅ. सौ. स्मिता सदानंद मुकणे .
ठाणे.















