तू भिजावी, मी भिजावा
या रिमझिम बरसणाऱ्या पावसात
छत्रीतून बाहेर तू आणि मी
गाऊ दोघे प्रेमाची सौगात….
अलगद पडावे थेंब डोईवर
अन् घरंगळत तुझ्या ओठावर यावे
ओठांवरुन खाली पडू नये म्हणून
त्यां थेंबाना मी ओठात घ्यावे….
म्हणतात ना पाण्याला चव नाही
पण तुझ्या ओठांनी ते चवदार झाले
चाखून झाले तेव्हाच डोळ्यात
तुझ्या माझ्या संसाराचे चित्र ऊभे राहीले….
साक्षीदार प्रेमाचा पाऊस झाला
त्याच्या बरसण्यात प्रेम रंगला
सगळीकडे पाऊसच पाऊस
धरतीला भेटण्या जसा भुई अवतरला….
पावसाचा खेळ रंगत चालला
माती आणि पाण्याचा संगम झाला
त्यांच्या संगमातून चिखल झाला
आणि आमच्या संगमातून प्रेम बहरला….!
कवी – पुनाजी नारायण कोटरंगे
(रोमनकार)
गायडोंगरी, सावली, चंद्रपूर

