आझाद मैदान मुंबई येथे सकल नाभिक समाजाचे एक दिवशीय महाधरणे आंदोलन.

0
135

राज्यभरातून नाभिक बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी होणार 

शिरपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – त-हाडी श्री. संत सेनाजी महाराज केश शिल्पी महामंडळा करिता १०००, कोटी  निधीची तरतूद करावी. अध्यक्ष तथा कार्यकारी मंडळाची त्वरित नेमणूक करून.श्री संत सेनाजी केशशिल्पी महामंडळ कार्यान्वित करावे. या प्रमुख मागणीसाठी सकल नाभिक समाज महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्रातील सर्व नाभिक समाज संघटनांच्या वतीने ३० सप्टेंबर २०२४ रोजी आजाद मैदान येथे सकाळी दहा ते पाच या वेळेत महा धरणे आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
शासनाकडे नाभिक समाजाच्या अनेक मागण्या गत अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत मोर्चा आंदोलने निवेदने याद्वारे प्रयत्न करून देखील राज्यकर्त्यांनी नाभिक समाजाच्या  प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने  नाभिक समाज न्याय हक्कापासून वंचित राहिलेला आहे.
नाभिक समाजाच्या आर्थिक शैक्षणिक विकासासाठी श्री संत सेना महाराज आर्थिक विकास महामंडळ व्हावे या प्रमुख मागणीसह एकूण 22 मागण्या ६,७ ऑक्टोबर २००६ रोजी महाराष्ट्र नाभिक  मंडळाच्या रौप्य महोत्सवी राज्यव्यापी अधिवेशनात५० ते ६० हजार समाज बांधवांच्या उपस्थितीत तसेच त्यानंतर ३० मे २०११ रोजी आझाद मैदानात लाखो नाभिक समाज बांधवांच्या उपस्थितीत  महामोर्चाद्वारे करण्यात आल्या होत्या नागपूर व येथे होणाऱ्या अधिवेशनातही सातत्याने नाभिक समाजाच्या न्याय हक्कासाठी धरणे. मोर्चे आणि निदर्शने समाजाने संघटित होऊन केलेले आहेत. यावेळी केलेल्या मागण्यांमध्येही श्री संत सेना महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापित करावे या प्रमुख मागणीचा समावेश होता.
अधिवेशन आणि महामोर्चा नंतर शासन स्तरावर आर्थिक विकास महामंडळासह अनेक मागण्या बाबत सचिव पातळीवर कामकाज देखील चालले होते. तसेच या मागण्यांबाबत गेले अनेक वर्ष आम्ही सातत्याने पाठपुरावाही करीतआलेलो आहोत.
या नंतरच्या काळात उत्तर भारतात मध्य प्रदेश झारखंड, हरियाणा आधी राज्यात नाभिक समाजाच्या उन्नती व विकासासाठी केस शिल्पी महामंडळ तयार करण्यात येऊन त्यावर नाभिक समाजातील नेतृत्वाला राज्यमंत्र्याचा दर्जा देऊन अध्यक्ष तथा पदाधिकारी म्हणून शासनाच्या वतीने नेमणूक करण्यात आली होती
निवडणुका झाल्या नंतर महाराष्ट्रातील राजकारणात उलथापाल होऊन माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचे सरकार आले त्यांच्या कार्यकाळात त्यांनी या महामंडळाबाबत दखल घेतली नाही.
त्यातच कोरोना सारख्या महाभयंकर महामारीची  जीवघेणी साथ आली त्यामुळे आमचा प्रश्न हा प्रश्नच राहिला. त्यानंतर याबाबत पुढे काही कारवाई होऊ शकली नाही.
कोरोनाच्या काळात आरोग्याच्या कारणासाठी सलून व्यवसाय हा बंद ठेवण्यात आला होता त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच सलून व्यवसायिक हे हवालदिल झाले होते आर्थिक संकटात सापडले होते.राज्यकर्त्यांकडे माझ्यासह महाराष्ट्रातील सर्व संघटना समाज नेत्यांनी सामाजिक संस्थांनी नाभिक व्यावसायिकांना शासनाच्या वतीने मदत मिळावी अनुदान मिळावे या आपत्तीच्या काळात शासनाचे सहकार्य लाभावे याकरिता प्रयत्नशील होतो. परंतु वारंवार मागणी करूनही नाभिक समाजाला अपेक्षित असलेली मदत मिळू शकली नाही.याचा खेद आजही मनात आहे. कोरोना काळात आर्थिक कारणासह कौटुंबिक, व्यावसायिक कारणाने हतबल होऊन अनेक आत्महत्याही झाल्या तरीही शासनाकडून मदत मिळाली नाही. अशा प्रकारे अनेक वर्षापासून सातत्याने प्रयत्न करूनही राज्यकर्त्यांनी शासनकर्त्यांनी आम्हाला नेहमीच दुर्लक्षित केल्याचे दिसते आहे.
पुढे माननीय नामदार फडवणीस साहेब यांच्या संगनमताने व भारतीय जनता पक्षाच्या पुढाकाराने माननीय श्री नामदार एकनाथ रावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले महाराष्ट्रातील नाभिक समाजाच्या आशा पल्लवीत झाल्या. माननीय फडवणीस साहेब यांच्या कार्यकाळात घोषित केलेल्या  केशशिल्पी महामंडळाच्या कार्यास चालना मिळेल असा विश्वास आमच्या मनात निर्माण झाला. याचदरम्यान उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार अर्थमंत्री असताना अर्थसंकल्पात अर्थसंकल्पाच्या शेवटी नाभिक समाजासाठी तयार करण्यात आलेल्या श्री संत सेनाजी केशशिल्पी महामंडळाकरिता ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल असे आश्वासन दिले होते.
तदनंतर केश शिल्प महामंडळाकरिता १०००, कोटी निधी उपलब्ध करावा तसेच घोषित केलेल्या महामंडळाच्या रचनेत बदल करून सलून व्यावसायिकांसह नाभिक समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व नाभिक समाजातील महिला व इतर व्यवसायिकांना कमी व्याजदराचे आणि दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध व्हावे तसेच लवकरात लवकर कार्यकारी मंडळ घोषित करावे असा पत्रव्यवहार केल्यानंतर महामंडळाच्या रचनेत काहीसा बदल झाल्याचे जाणवते.
आत्ताही निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत कधीही निवडणुकीची आचार संहिता ही लागू होईल. अजूनही  नाभिक समाजाच्या विकासाच्या दृष्टीने तयार करण्यात आलेले केशशिल्पी महामंडळासाठी अपेक्षित असलेला निधी उपलब्ध झालेला नाही. अध्यक्ष व सदस्यांची नेमणूकही झालेली नाही याबाबत शासनाने राज्यकर्त्यांनी त्वरित निर्णय घेऊन हे महामंडळ कार्यान्वित करावे अशी अपेक्षा नाभिक समाजाची आहे  या मागणी करिताच३० सप्टेंबर रोजी मुंबई येथेआझाद मैदानावर एकदिवशीय महाधरणे आंदोलन करण्याचा निर्धार सकल नाभिक समाजाने केला आहे.
निवडणुका घोषित होईल महिन्या दोन महिन्यात आचार संहिताही लागल्यास खऱ्या अर्थानेअपेक्षित असलेले केस शिल्पी मंडळ अस्तित्वात येणार नसल्याने त्यामुळे महाराष्ट्रातील  नाभिक समाजाचा अपेक्षाभंग होत असल्याचे चित्र समाज मनामध्ये निर्माण झाले आहे.
नाभिक समाजाचे प्रश्न समस्या आणि केश शिल्पी महामंडळ या दृष्टिकोनातून सागर बंगल्यावर नुकतीच एक बैठक संपन्न झाली त्या बैठकीत आलेल्या अनेक संघटना व कार्यकर्ते अनेकार्थी निराश झाले. याबाबत राज्यभरात सोशल मीडियाच्या माध्यमातून नाभिक समाजाच्या मनातील राग, संताप व्यक्त होताना दिसतो आहे.
क्रांती मित्र किरण भांगे यांच्या पुढाकाराने एकीकडे नाभिक समाजाला न्याय मिळावा यासाठी  सकल नाभिक समाजाच्या वतीने ३० सप्टेंबर रोजी महाधरणे आंदोलन करण्याचा निर्धार केला असून त्या स राज्यभरातून नाभिक समाज व अनेक संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दुसरीकडे  मात्र केश शिल्पी महामंडळावर अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य पदाकरिता इच्छुकांची संख्या तिन्ही पक्षाकडे शेकडोंनी आहे सत्तापद पाहिजे, राज्यमंत्र्याचा दर्जा असलेल्या महामंडळावर अध्यक्ष म्हणून नेमणूक व्हाव या करिता अनेक आमदार खासदार यांच्या शिफारशी जमा करून प्रयत्न करणाऱ्या इच्छुकांनीही समाजाने पुकारलेल्या आंदोलनात सहभाग होणे आवश्यक असताना ते तटस्थ भूमिकेत असल्याचे दिसत आहे.  त्यांनी राजकीय पक्ष समाजाचे प्रश्न दोहो पैकी एकाचाच. प्रथमस्थानी विचार करावा. समाज पाठीशी असेल तरच राजकीय पक्ष तुमचा विचार करणार आहे. अन्यथा आपले महत्त्व शून्य त्यामुळे नंतर समाजानेही आपल्याकडे आणि आपल्या पक्षाकडेही पाठ फिरवली तर काय होईल याचा विचार करावा, प्रथम समाजाचे प्रश्न सोडविणे आणिसमाजावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. हे आपले प्रथम कर्तव्य आहे. याचा विचार हवेत असणाऱ्या नेत्यांनी करावा हीच अपेक्षा.
.लढाई लढल्याशिवाय जिंकता येत नाही आणि आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही म्हणून ३० सप्टेंबरच्या एक दिवशीय महाधरणे आंदोलनाकरता महाराष्ट्रातील समाज मन अधीर झाले आहे.
सध्याची राजकीय स्थिती दोलायमान अवस्थेत आहे. सर्वच राजकीय पक्ष मतांची जुळवा जुळव करण्याकरिता प्रयत्नशील आहेत. नाभिक समाज देखील राज्यातला एक मोठा जागृत आणि संघटित समाज आहे राजकारण्यांनी या समाजाच्या प्रश्नांकडे डोळे झाक करून कसे चालणार सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकीच्या दृष्टीने नाभिक समाजाची ही मते हवी आहेत.याची जाण नाभिक समाजातील संघटना आणि नेतृत्वालाही आहे.तेव्हा लढा आणि संघर्ष करण्याची हीच खरी वेळ असल्याने आता नाही तर केव्हाच नाही. या भूमिकेतून सामाजिक न्यायहक्कासाठी लढा पुकारण्यात आलेला आहे.
नाभिक समाजाच्या या आंदोलनाबाबत राज्यकर्त्यांनी अर्थातच माननीय देवेंद्रजी फडवणीस साहेब यांनी पुढाकार घेऊन नाभिक समाजाला न्याय व त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा हीच अपेक्षा नाभिक समाजाची आहे
माननीय मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस साहेब तसेच माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने ३० सप्टेंबरच्या आंदोलनाच्या अगोदर नाभिक समाजाच्या शिष्टमंडळाला प्रचारित करून मागण्या मान्य केल्यास नाभिक समाजाला न्याय मिळाल्याचे समाधान होईल.
याकरिता नाभिक समाजाने एक विचाराने संघटित होऊन या संघर्ष लढ्यात सहभागी झाले पाहिजे कोण नेता कोण कार्यकर्ता यापेक्षा माझा समाज मोठा हे या आंदोलनातून दाखवून देणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here