भाग ४ – असीम त्याग व सर्वस्व अर्पिणाऱ्याचे शोकनाट्य : संगीत मत्स्यगंधा

0
83

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – रंगकर्मी रंगभूमी वडसा नित्यानंद बुद्ध निर्मित, प्रा. वसंत कानेटकर लिखित, सिने. नरेश गडेकर दिग्दर्शित संगीत मत्स्यगंधा या पौराणिक नाटकाचा प्रयोग अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या विभागीय नाट्य संमेलन नागपूर येथे झाला.
‘संगीत मत्स्यगंधा’ हे महाभारतातील राजा शंतनू आणि गंगापुत्र देवव्रत अर्थात भीष्माचार्य यांच्या जीवनाच्या कथानकाचे पौराणिक नाटक आहे. राधा शंतनू व मत्स्यगंधा यांच्या प्रेम साफल्यासाठी आपल्या प्रेमाची विसर्जन करणाऱ्या भीष्माच्या अलोकिक त्यागाचे दर्शन घडविणारे पौराणिक नाटक आहे. सर्व असूनही कोणतेही गोष्टीचा उपयोग घेता येत नसल्याची शोकांतिका दर्शविणारे नाटक आहे.पराशरमुनींवर प्रेम करणारी सत्यवती प्रेमभंगामुळे निष्ठूर होते. त्याचे अत्यंत घातक परिणाम तिला स्वत:ला व देवव्रताबरोबरच अनेकांना भोगावे लागतात. अत्यंत गहन नाजूक विषयावरचे नाटक आहे. सम्राट शंतनू देवव्रताचे वडील, आई गंगामाईच्या मृत्यूनंतर अठरा वर्ष विवाहापासून अलिप्त राहतात .एक दिवस गंगा किनारी धीवर कन्या सत्यवतीच्या प्रेमात शंतनू पडतात आणि तिच्या सोबत विवाह करण्यात उत्सुक होतात. परंतु जन्माला येणारे बाळ राजा होणार नाही सत्यवतीने निर्माण केलेल्या अडचणीमुळे बेचैन होणारा शंतनू आणि त्यातून भीष्माने आजन्म वैराग्य धारण करण्याचे ,लग्न न करण्याची केलेली प्रतिज्ञा शिवाय बाळ न जन्माला घालण्याचे दिलेले वचन, यामुळे शंतनूची अडचण दूर होते आणि सत्यवतीशी विवाह होतो. शंतनुच्या मृत्यूनंतर मात्र स्वयंवरातून अंबालिका जिंकून आणल्यानंतर तिच्यावर शाल्व राजाचे असलेले प्रेम, अंबालिकाने शाल्वाकडे परत पाठविण्याची केलेली विनंती आणि जिंकलेली वस्तू परत पाठवणे हा धर्म नाही म्हणून राजाने नाकारणे, तिची तळमळ अगतिकता आणि विनंती पाहून राजा उदार अंत:करणाने तिला शाल्वाकडे पाठवतो. परंतु शाल्वही तिला नाकारतो. भीष्म – शाल्व युद्धात ती प्रणयीसारखे बघत होती, हे त्याला खटकते. तो तिला परत जाण्यास सांगतो. अशा विमनस्क , द्विधा अवस्थेत असलेली शिवाय तिला ‘तुझा मार्ग तूच शोध म्हणणारा कठोर राजा’ कुरू वंशाला दिवा हवा, वंश नष्ट होऊ नये, यासाठी किमान बाळ जन्माला घाल. म्हणून केलेली विनवणी, तुझा मृत्यु दे म्हणताच तथास्तु म्हणणारा, कुठलीही इच्छा पूर्ण करता येत नाही असा विलक्षण जगणारा, स्वतःचा मृत्यूही देणारा, प्रतिज्ञेला आयुष्यभर निष्ठेने चिकटून राहणारा ब्रह्मचर्य आयुष्यभर पाळणारा,सर्वस्व अर्पिणाऱ्या भीष्माचे हे शोकनाट्य आहे.
अप्रतिम संगीताने व पल्लेदार संवादांने सजलेल्या नाटकात सिने. नरेश गडेकर यांनी देवव्रत अर्थात भीष्माचार्यांची मानसिक दोलायमानता व अगतिकता आपल्या पल्लेदार संवादातून व देहबोलीतून उत्कटपणे साकारले. खरे तर अशा संगीत नाटकातून भारदस्त आणि पल्लेदार संवाद बोलणं कठीण काम आहे. ही किमया फार कमी लोक करू शकतात. मात्र नरेशजी गडेकर यांनी प्रचंड पाठांतर व उत्तम संवादफेकीच्या कसबामुळे समर्थपणे भूमिका जिवंत केली.अंबालिकाची मनस्थिती, प्रेम, विरह वेदना, सोबतच अगतिकता व नकारात्मकता पचवण्याची क्षमता असलेली सहनशील, पण प्रसंगी करारीपणाची भूमिका सिने.आसावरी तिडके यांनीआंगीक व वाचिक अभिनयाद्वारे उत्तमरीत्या वटविली. नाट्यसमेलनातील नाट्य रसिकांना पौराणिक नाटकाचा आस्वाद घेता आला.

प्रा. राजकुमार मुसणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here