3 जर्सी गाय मृत.
नवनाथ उल्हारे
कोपरगाव शहर प्रतिनिधी
7744022677
कोपरगाव तालुक्यातील वारी या गावात गोदावरी बायो रिफायनरीज लि. साखरवाडी ही केमिकल कंपनी असून या कंपनीमध्ये क्रोटोनील डिहाईड व इतर अन्य केमिकल तयार होतात. सदर केमिकल तयार करताना जे वेस्टेज बाहेर पडते ते स्प्रिंकलर द्वारे जवळील काटवनात सोडले जाते. सदर पाणी हे ड्रेनेज द्वारे सोडतात. तसेच 8 इंच पाईपलाईन द्वारे अन्य केमिकल चे पाणी गोदावरी पंपात सोडले जाते. अगोदर सदर पाणी साठवले जाते. व पहाटे 4 च्या सुमारात वेस्टेज ड्रेनेज मधून सोडले जाते. सदर वेस्टेजमुळे गोदावरी नदीचे पाणी पूर्णपणे दूषित होतेच परंतु ड्रोनेजमधून जे क्रोटोचे वेस्टीज पाणी जनावरे पीत असताना तीन जर्सी गाई मृत पावल्या आहे . व अन्य जनावरे ही हे पाणी पीत असताना पूर्णपणे अशक्त झाले असून कृष झाल्या आहेत. व अन्य जनावरांनाही रोग निर्माण झालेला आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यां कडे वारंवार तक्रार कली असता ते आम्हालाच दमदाटी करतात शिवीगाळ करतात. व अनेक वेळा आम्हाला मारहाण देखील केलेली आहे. तरी सदर घटनेची तातडीने चौकशी होऊन ड्रेनेज मधून जे केमिकलचे पाणी नदीत सोडले जाते ते ताबडतोब बंद करावे अन्यथा आम्हाला जनावरे व कुटुंबासह गोदावरी बायो रिफायनरीज कंपनीच्या गेटवर आम्ही आमरण उपोषण करू असे प्रशांत रमेश कोरके. ज्ञानेश्वर छबुराव वाडेकर. विनोद मायकल गायकवाड यांनी सदर पत्रकार व मीडियासमोर माहिती दिली.

