मतदान करावे सारे
हा आहे मानव अधिकार
मतदानानेच होतो देशाच्या
भवितव्याच्या घडणीचा आकार
कळावे अन कळवून द्यावे
मताचे महत्त्व साऱ्यांना आधी
वाया घालवू नये कोणी
ही धडपड नाही साधी
एका मताने काय होईल?
विचार करू नये कधी
हा एकच मत आहे जनतेचा
इथे भेद नाही मत द्यावे आधी
मतदानाचे महत्त्व पुढच्या ५ वर्षाचे
भवितव्य विचार करावे अन मत द्यावे
उजळेल देशाचे भविष्य या मताने
मत द्यावे सारे देश प्रगती कडे न्यावे
कवयित्री रंजना भैसारे
नागपूर

