रक्षाबंधन हा आपला महत्वाचा सण आहे..या सणाला “राखी पोर्णिमा “असेही म्हणतात. हा सण श्रावण महिन्यात येतो. या सणाला बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतिक मानले जाते.राखी बांधण्याच्या विधीला “पवित्रा रोपण “असेही म्हणतात.आपल्या भावाचा उत्कर्ष व्हावा,भले व्हावे व कठिण प्रसंगी भावाने आपले रक्षण करावे असा उद्देश हा सण साजरा करण्यामागे असतो.
या श्रावण पौर्णिमेला” पोवती पोर्णिमा “असेही म्हणतात. कापसाच्या सुताच्या नऊ धाग्यांची जुडी करून तिला आठ,बारा, किंवा चौवीस गाठी मारतात व देवांचे आवाहन करून प्रथम देवास बांधून नंतर भावाच्या मनगटावर बांधतात. या पोर्णिमेला ‘श्रावणी ‘असेही म्हणतात.
इतिहास असे सांगतो की ऐतिहासिक काळात चित्तोडची राणी कर्मवतीने हुमायूॅ बादशहा यांना राखी पाठवली व हुमायूॅ बादशहाने आपल्या या बहिणीचे बहादूरशहाने केलेल्या आक्रमणापासून रक्षण केले.
‘राखी’ या शब्दातच” रक्षण कर “हा संकेत आहे.राखी पोर्णिमेच्या दिवशी राखीचा धागा शूरवीर करारी पुरूषांच्या मनगटावर बांधून त्यांच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची प्रथा आहे.स्रीचा सन्मान करण्याची प्रथा म्हणजे रक्षाबंधनाचा सण.भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सण.या सणाला हिन्दू संस्कृतीत खूप महत्त्व आहे.
या सणाबद्दल खुप आख्यायिका सांगितल्या जातात.
द्रौपदीने आपल्या साडीचा कोपरा फाडून श्रीकृष्णाच्या जखमी मनगटावर बांधला होता.आणि श्रीकृष्णाने तिचे द्रौपदी वस्रहरणाच्या वेळी वस्त्र पुरवून रक्षण केले होते.राखीपोर्णिमेच्या दिवशी सख्या भावाच्या हातावर राखी बांधतात तसेच बंधुत्वसमान नाते असलेल्या व्यक्तीच्या मनगटावर राखी बांधतात.ठिकठिकाणी सार्वजनीक राखी सभारंभ ही आयोजित केले जातात.जेणेकरून बंधूत्वाचे नाते निर्माण व्हावे, स्त्रीचा सन्मान व्हावा ,तिचे रक्षण व्हावे हा हेतू असतो.असा हा मंगलमय सण आपल्या भारतीय संस्कृतीचे,परंपरेचे प्रतीक आहे.
आपला राष्ट्रीय सण आहे.
लेखिका गुलाब अनिल वेर्णेकर गोवा

